महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ न-१ :
वर्षातील बदल्यांची कमाल टक्केवारी :
कलम २२ न च्या पोट-कलम (१) मध्ये किंवा या अधिनियमाच्या इतर कोणत्याही तरतुदींमध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, कोणत्याही एकाच विभागामधून किंवा कार्यालयामधून पोलीस कर्मचारीवर्गाच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या झाल्यामुळे, शासकीय कामकाजावर त्याचा प्रतिकूल परिणाम होणार नाही याची सुनिश्चिती करण्यासाठी, कोणत्याही कार्यालयामधून किंवा विभागामधून एका वर्षात एकावेळी एक-तृतीयांशापेक्षा अधिक कर्मचारीवर्गाची बदली करता येणार नाही.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.