भारताचे संविधान ( राज्यघटना ) :
१.(अकरावी अनुसूची :
(अनुच्छेद २४३छ)
पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या :
१) कृषि, कृषिविस्तारासह.
२) जमीन सुधारणा, जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण व मृदसंधारण.
३) लहान पाटबंधारे, पाण्याचे व्यवस्थापन व पाणलोट क्षेत्रविकास.
४) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व कुक्कुटपालन.
५) मत्स्यव्यवसाय.
६) सामाजिक वनीकरण व क्षेत्र वनीकरण.
७) गौण-वन उत्पादन.
८) लघुउद्योग, अन्न प्रक्रिया उद्योगासह.
९) खादी ग्रामोद्योग व कुटिरोद्योग.
१०) ग्रामीण गृहनिर्माण.
११) पिण्याचे पाणी.
१२) इंधन व वैरण.
१३) रस्ते, नाले, पूल, तरी, जलमार्ग व दळणवळणाची अन्य साधने.
१४) ग्रामीण विद्युतीकरण, विद्युत वितरणासह.
१५) अपारंपरिक ऊर्जा साधने.
१६) गरिबी हटाव कार्यक्रम.
१७) शिक्षण, प्राथमिक व माध्यमिक शाळांसह.
१८) तांत्रिक प्रशिक्षण व व्यवसाय शिक्षण.
१९) प्रौढ व अनौपचारिक शिक्षण.
२०) ग्रंथालये.
२१) सांस्कृतिक कार्य.
२२) बाजार व जत्रा.
२३) आरोग्य व स्वच्छता, रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने यांसह.
२४) कुटुंबकल्याण.
२५) महिला व बालविकास.
२६) समाजकल्याण, अपंग व मानसिक वाढ खुंटलेल्यांच्या कल्याणासह.
२७) दुर्बल घटकांचे कल्याण व विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे कल्याण.
२८) सार्वजनिक वितरण पद्धती.
२९) सामाजिक मत्तांचे परिरक्षण.)
----------
१. संविधान (त्र्याहत्तरावी सुधारणा) अधिनियम १९९२ याच्या कलम ४ द्वारे जादा दाखल केली. (२४ एप्रिल १९९३ रोजी व तेव्हापासून).
#IndianConstitutionSchedule11Marathi
#ConstitutionIndiaMarathiSchedule11
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.