फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३
कलम ४३६-अ :
न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल :
जर एखादी व्यक्ती, कोणत्याही कायद्याखालील अपराधासाठी (ज्यासाठी त्या कायद्याखालील एक शिक्षा म्हणून मृत्यूची शिक्षा विनिर्दिष्ट केलेली आहे असा अपराध नसलेल्या) व संहितेन्वये अन्वेषण चौकशी किंवा संपरीक्षा चालू असलेल्या कालावधीच्या दरम्यान स्थानबद्द झालेली असेल, जो कालावधी त्या अधिनियामन्वये त्या अपराधासाठी विनिर्दिष्ट केलेल्या कमाल कालावधीच्या अध्र्यांपेक्षा अधिक इतका असेल तर, न्यायालय त्या व्यक्तीला प्रतिभूतीसह किंवा प्रतिभूतीशिवायच्या व्यक्तिगत जातमुचल्याकवर सोडून देईल.
परंतु असे की, न्यायालय सरकारी अभियोक्त्याचे म्हणणे ऐकल्यावर आणि कारणे लेखी नमूद करून त्या व्यक्तीची स्थानबद्धता उक्त कालावधीच्या अध्र्यापेक्षा अधिक कालावधीसाठी चालू ठेवू शकेल किंवा प्रतिभूतीसह किंवा प्रतिभूतीशवायच्या जातमुचल्याक्याविना जामिनावर मुक्त करू शकेल.
परंतु आणखी असे की, अशा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही बाबतीत अन्वेषण, चौकशी किवा संपरीक्षेच्या कालावधीत, त्या कायद्यानवे त्या अपराधाखाली तरतुद केलेल्या कमाल कालावधीपेक्षा अधिक कालावधीसाठी स्थानबद्धतेत ठेवणार नाही.
स्पष्टीकरण - या कलामन्वये जामिनावर मुक्त करण्यासाठी कालावधी मोजताना आरोपीने कार्यवाहीमध्ये विलंब केल्यामुळे स्थानबद्धतेत घालविलेला कालावधी वगळ्यात येईल. (फौजदारी प्रक्रिया संहिता (सुधारणा) अधिनियम, २००५ (२००५ चा २५) कलम ३६ द्वारे दिनांक २३.०६.२००६ पासून घातला.).
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.