माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २०००
कलम ८६ :
अडचणी दूर करणे :
१) या अधिनियमाच्या तरतुदी अमलात आणताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास केंद्र शासन राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, अडचण दूर करण्यसाठी त्याला आवश्यक किंवा इष्ट वाटेल अशा या अधिनियमाच्या तरतुदींशी विसंगत नसतील अशा तरतुदी करील.
परंतु असे की, या अधिनियमाच्या प्रारंभापासून दोन वर्षांचा कालावधी समाप्त झाल्यानंतर या कलमान्वये कोणताही आदेश काढण्यात येणार नाही.
२) या कलमान्वये काढलेला प्रत्येक आदेश तो काढण्यात आल्यानंतर शक्य तितक्या लवकर संसदेच्या प्रत्येक सभागृहासमार मांडण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.