महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम २८ :
सद्भावनेने काम करणाऱ्या व्यक्तींस द्यावयाचे संरक्षण आणि दावे व खटले यांची मुदत मर्यादा :
(१) या अधिनियमान्वये अथवा त्याअन्वये केलेल्या नियमांन्वये सद्भावनेने केलेल्या किंवा करण्याचा इरादा असलेल्या कोणत्याही कृत्याबद्दल शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध कोणताही दावा, खटला किंवा इतर कायदेशीर कारवाई दाखल करता येणार नाही.
(२) राज्याविरूद्ध कोणताही दावा करता येणार नाही आणि या अधिनियमान्वये केलेल्या किंवा करण्याचा इरादा असलेल्या कोणत्याही कृत्यासंबंधाने शासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याविरूद्ध कोणताही खटला अगर दावा हा, ज्यासंबंधी तक्रार केली असेल ते कृत्य घडल्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत उक्त दावा अगर खटला न केल्यास, करता कामा नये.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.