महाराष्ट्र लॉटऱ्या अधिनियम १९५८
कलम ३४ :
निरसन आणि व्यावृत्ती :
पुढील अधिनियम म्हणजेच -
(१) मुंबई लॉटऱ्यांवर व बक्षीस स्पर्धांवर नियंत्रण ठेवण्याबाबत व त्यावर कर बसविण्याबाबत अधिनियम, १९४८ (१९४८ चा मुंबई ५४)
(२) सौराष्ट्राच्या लॉटऱ्यांवर व बक्षीस स्पर्धांवर नियंत्रण ठेवण्याबाबत व त्यावर कर बसविण्याबाबत अधिनियम, १९५१ (१९५१ चा सौराष्ट्र १६)हे याद्वारे निरसित करण्यात येत आहेत :
परंतु, अशा रीतीने अधिनियम निरसित करण्यात आल्यामुळे अशा रीतीने निरसित केलेल्या कोणत्याही अधिनियमान्वयेच्या पुढील गोष्टींना बाध येणार नाही -
(अ) या अधिनियमाच्या प्रारंभाच्या अगोदरच संपादन केलेल्या किंवा उपर्जित झालेल्या किंवा पत्करलेल्या कोणत्याही हक्कास, विशेषाधिकारास, जबाबदारीस किंवा पात्रतेस;
(ब) अशा हक्काच्या, विशेषाधिकाराच्या, आबंधनाच्या किंवा दायित्वाच्या बाबतीत केलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईस किंवा उपाययोजनेस किंवा;
(क) कोणताही कर किंवा फी बसविण्यास, आकारण्यास, जमा करण्यात किंवा परत करण्यास किंवा या अधिनियमाच्या प्रारंभाच्या पूर्वी देण्याजोगा असलेला कोणताही दंड लादण्यास किंवा वसूल करण्यास;
आणि जणू हा अधिनियम पारित झाला नसल्याप्रमाणे अशी कोणतीही कार्यवाही दाखल करण्याचा, चालू ठेवण्याचा किंवा निकालात काढण्याचा, आणि अशी कोणतीही उपाययोजना अमलात आणता येईल आणि असा कोणताही कर किंवा फी बसविता येईल, आकारता येईल किंवा जमा करता येईल किंवा परत करण्याचा आणि असा कोणताही दंड बसविता किंवा वसूल करता येईल.
तसेच, याद्वारे निरसित करण्यात आलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमांन्वये दिलेला आणि या अधिनियमाच्या प्रारंभाच्या लगतपूर्वी अमलात असलेले लॉटरीच्या संबंधातील कोणतेही लायसन्स, जेथवर ते या अधिनियमाच्या तरतुदींपैकी कोणत्याही तरतुदींशी विसंगत नसेल तेथवर, या अधिनियमान्वये अंमलात असण्याचे चालू राहील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.