महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९५९
कलम २४ :
बिनशर्त सोडून देणे :
कलम २२ अन्वये कोणत्याही व्यक्तीस लायसेन्सवर सोडून दिल्याच्या तारखेपासून तीन महिने संपल्यानंतर कोणत्याही वेळी मुख्य निरीक्षकाची खात्री झाली की, अशी व्यक्ती भीक मागण्यापासून परावृत्त होण्याचा संभव आहे तर, त्याला बिनशर्त सोडून देण्याविषयी राज्य शासनाकडे शिफारस करण्याचा मुख्य निरीक्षकास अधिकार आहे. अशा शिफारशीवरून अशा व्यक्तीला बिनशर्त सोडून देण्याचा राज्य शासनास अधिकार आहे, आणि त्याला अशा रीतीने सोडून दिल्यानंतर प्रमाणित संस्थेत त्याला ज्या मुदतीपर्यंत अटकावून ठेवण्याचा आदेश दिला असेल ती मुदत संपली असे समजण्यात येईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.