पासपोर्ट (पारपत्र) अधिनियम १९६७
कलम ११ :
अपिले :
(१) एखादी व्यक्ती कलम ५ च्या पोटकलम (२) मधील खंड (ख) किंवा खंड (ग) अन्वये अथवा कलम ७ च्या परंतुकामधील खंड (ख) अन्वये अथवा कलम १० च्या पोटकलम (१) किंवा पोटकलम (३) अन्वये पासपोर्ट प्राधिकरणाने दिलेल्या आदेशांमुळे किंवा पासपोर्ट प्राधिकरण ज्याच्या अधीन असेल अशा प्राधिकरणाने कलम १० च्या पोटकलम (६) अन्वये दिलेल्या आदेशामुळे नाराज झाली असेल तर, ती व्यक्ती अशा आदेशाविरूद्ध विहित करण्यात येईल अशा प्राधिकरणाकडे (यात यापुढे ‘अपील प्राधिकरणङ्क म्हणून त्याचा निर्देश करण्यात आला आहे) आणि अशा विहित कालावधीमध्ये अपील करू शकेल :
परंतु, केंद्र शासनाने काढलेल्या कोणत्याही आदेशाविरूद्ध अपील करता येणार नाही.
(२) विहित केलेला कालावधी संपल्यानंतर कोणतेही अपील दाखल केल्यास ते दाखल करून घेतले जाणार नाही :
परंतु, विहित कालावधीत अपील दाखल न करण्याला आपणास पुरेसे कारण होते याबद्दल अपीलकत्र्याने अपील प्राधिकरणाची खात्री पटवून दिली तर, विहित कालावधी संपल्यानंतरही अपील दाखल करून घेता येईल
(३) अपिलासाठी विहित केलेल्या कालावधीची संगणना, मुदत अधिनियम, १९६३ (१९६३ चा ३६) यात मुदतीची संगणना करण्याबाबत असलेल्या उपबंधानुसार करण्यात येईल
(४) या कलमाखालील प्रत्येक अपील लेखी विनंतीअर्जाद्वारे करावे लागेल आणि ज्या आदेशाविरूद्ध अपील करण्यात आले आहे त्या आदेशाची कारणे दर्शविणाऱ्या निवेदनाची एखादी प्रत जर अपीलकत्र्याला देण्यात आली असेल तर, त्या कारणांच्या निवेदनाची प्रत आणि संबंधित अभिलेख मागविण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित सेवांसाठी करण्यात येईल तो खर्च भागवण्याकरिता विहित करण्यात येईल अशी फी, अशा विनंती अर्जासोबत पाठवावी लागेल
(५) अपील निकालात काढताना, अपील प्राधिकरण, विहित केली असेल अशी कार्यपद्धती अनुसरील :
परंतु, अपीलकत्र्याला आपली बाजू मांडण्याची वाजवी संधी देण्यात आल्याखेरीज कोणतेही अपील निकालात काढण्यात येणार नाही
(६) ज्या आदेशाविरूद्ध अपील केले असेल तो आदेश कायम करणारा, त्यात फेरफार करणारा किंवा तो फिरवणारा अपील प्राधिकरणाचा प्रत्येक आदेशा अंतिम असेल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.