महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ९१
काही अपराध करण्यापासून परावृत्त होण्यासाठी प्रतिभूती मागणे :
१) ह्या अधिनियमान्वये शिक्षापत्र असलेला अपराध केल्याबद्दल कोणत्याही व्यक्तीस सिद्धापराध ठरविण्यात येईल, तेव्हा अशा व्यक्तीला सिद्धापराध ठरविणाऱ्या न्यायालयास तिला शिक्षा देताना, ह्या अधिनियमाच्या तरतुदींन्वये शिक्षापात्र असलेला अपराध न्यायालय निदेश देईल अशा जास्तीत जास्त तीन वर्षांच्या मुदतीत त्याने करू नये म्हणून त्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणात असलेल्या रकमेचे बंधपत्र, जामिनानिशी किंवा जामिनावाचून, करून देण्याविषयी त्याला आदेश देता येईल.
२) असे बंधपत्र (फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८ च्या तरतुदींन्वये तरतूद करण्यात येईल अशा नमुन्याप्रमाणे असले पाहिजे; आणि उक्त संहितेच्या तरतुदी, जेथवर लागू होतील तेथवर, अशा बंधपत्रासंबंधी असलेल्या सर्व गोष्टींना जणू असे बंधपत्र शांतता राखण्यासाठी सदर संहितेचे कलम १०६ अन्वये करून देण्यास फर्माविले आहे असे समजून लागू होतील.
३) अपिलात अपराधसिद्धी रद्द झाल्यास, अशा रीतीने करून दिलेले बंधपत्र निरर्थक होईल.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.