महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २४२ :
बेकायदेशीर रीत्या जमीन कब्जात ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस निष्कासित करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याने कशी कार्यवाही करावी :
जेव्हा जेव्हा या संहितेअन्वये किंवा त्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये जिल्हाधिकाऱ्यास अन्याय्य रीतीने जमीन कब्जात ठेवणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस निष्कासित करता येईल किंवा तो तसे करील अशी तरतूद करण्यात आली असेल तेव्हा असे निष्कासन पुढील रीतीने करण्यात येईल ;-
क)जमीन कब्जात असणाऱ्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना (उक्त नोटीस मिळाल्यानंतर वाजवी वाटेल अशा मुदतीत ) जमीन सोडण्याबाबत फर्मावणारी नोटीस त्यांच्यावर बजावून, आणि
ख)जर अशा नोटिशीचे पालन करण्यात आले नाही तर, ती जमीन सोडण्यास नकार देण्याऱ्या व्यक्तीस काढून टाकून किंवा त्या व्यक्तीला काढून टाकण्यासाठी हाताखालील व्यक्तीस प्रतिनियुक्त करून, आणि
ग)जर अशा कोणत्याही व्यक्तीला काढून टाकणाऱ्या अधिकाऱ्यास कोणत्याही व्यक्तीने विरोध किंवा अडथळा केला तर जिल्हाधिकारी त्या प्रकरणातील वस्ुस्थितीची संक्षिप्त चौकशी करील आणि असा विरोध किंवा अडथळा कोणत्याही न्याय्य कारणावाचून करण्यात आला आणि असा विरोध किंवा अडथळा चालूच आहे अशी त्याचा खात्री झाल्यास जिल्हाधिकाऱ्याला, असा विरोध किंवा अडथळा केल्याबद्दल त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये अशी व्यक्ती ज्या कार्यवाहीस पात्र होईल अशा कोणत्याही कार्यवाहीस बाध न येऊ देता, उक्त व्यक्तीच्या अटकेसाठी अधिपत्र (वारंट) काढता येईल आणि ती हजर झाल्यावर असा अडथळा किंवा विरोध चालू राहण्यास प्रतिबंध करण्यास आवश्यक असेल अशा, तीस दिवसांपेक्षा अधिक नसेल इतक्या, मुदतीसाठठी, तिला जिल्हाधिकाऱ्यांच्या किंवा कोणत्याही तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये अभिरक्षेत ठेवण्यासाठी किंवा अनुसूची घ मधील नमुन्यातील अधिपत्र (वारंट) देऊन तिला जिल्हाच्या दिवाणी तुरूंगात कारावासासाठी पाठविता येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२४२
#MLRCAct1966Marathisection242 #section242MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.
This section is applicable which lands,or govt land or private lands.?