महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २५१ :
मुदत संपल्यानंतर अपील दाखल करून घेणे :
जेव्हा अपील करणारी किंवा , यथास्थिती, अर्ज करणारी व्यक्ती, अपील किंवा, यथास्थिति, अर्ज करण्यासाठी जी मुदत विहित करण्यात आली असेल त्या मुदतीत अपील किंवा अर्ज न करण्यास तिच्याजवळ पुरेसे कारण होते अशी, ज्या अधिकाऱ्याकडे किंवा राज्य शासनाकडे अपील किंवा अर्ज करील त्या अधिकाऱ्याची किंवा राज्य शासनाची खात्री पटवून देईल तेव्हा, या प्रकरणान्वये पुनर्विलोकनासाठी केलेले कोणतेही अपील किंवा अर्ज, त्यासाठी विहित केलेल्या मुदतीनंतर दाखल करून घेता येईल.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२५१
#MLRCAct1966Marathisection251 #section251MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.