महाराष्ट्र (मुंबई)दारूबंदी अधिनियम १९४९
कलम ८९
दुर्भावपूर्वक खोटी माहिती पुरविल्याबद्दल शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती, ह्या अधिनियमान्वये अधिकार चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस दुर्भावपूर्वक व खोटेपणाने माहिती देईल व त्यामुळे मोणत्याही जागेची झडती घेण्यात येईल, कोणताही माल जप्त करण्यात येईल, कोणत्याही व्यक्तीस अटकवून ठेवण्यात येईल किंवा अटक करण्यात येईल तर, त्या व्यक्तीस, सिद्धापराध ठरविण्यात आले असता, सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल किंवा (दहा हजार रूपयांपर्यंत) असू शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.