महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६
कलम २६३ :
आकारणी विषयक समझोता कोणाबरोबर करावा :
१)जमिनीच्या प्रत्येक भागाच्या जमीन महसुलविषयक आकारणीबाबत समझोता तिच्या वरिष्ठ धारकांबरोबर करण्यात येईल.
२)जर वरिष्ठ धारक गैरहजर असेल आणि मुंबईत त्याचा माहीत असलेला असा कोणताही प्राधिकृत अधिकर्ता नसेल किंवा जमिनींचा वरिष्ठ धारक म्हणून समजला जाण्याचा कोणाला हक्क आहे याबद्दल वाद असेल तर, जमिनीचा प्रत्यक्ष ताबा ज्या व्यक्तीकडे असेल त्या व्यक्तीबरोबर समझोता करता येईल आणि अशा रीतीने ठरविलेली कोणतीही आकारणी त्या जमिनीचा जो कायदेशीर वरिष्ठ धारक असेल त्याच्यावर बंधनकारक राहील.
३)ताबा असणाऱ्या व्यक्तीने या संहितेच्या तरतुदीनुसार दिलेली कोणतीही रक्कम ही वरिष्ठ धारकाच्या वतीने दिलेली रक्कम आहे असे मानण्यात येईल.
४)जेव्हा वरिष्ठ धारक किंवा ज्या व्यक्तीकडे ताबा असेल ती व्यक्ती सहजगत्या निश्चित ठरविता येत नसेल अशा बाबतीत. जिल्हाधिकारी, उक्त जमिनीत किंवा जमिनीवर वरिष्ठ धारक म्हणून हक्क सांगणाऱ्या किंवा उक्त जमिनीच्या कब्जाबाबत अधिकार सांगणाऱ्या सर्व व्यक्तींना जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात त्यांनी अशा हक्काविषयी कळवावे अशी नोटीस देईल.
५)जर कोणत्याही व्यक्तीने, अशी नोटीस दिल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या आत जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यास कळवून असा अधिकार प्रस्थापित केला नसेल तर, जिल्हाधिकाऱ्याला स्वेच्छा निर्णयानुसार अशा जमिनींची आकारणी करता येईल आणि वरिष्ठ धारक आणि त्यावेळी किंवा त्यानंतर जमिनीचा ताबा ज्या व्यक्तीकडे असेल ती प्रत्येक व्यक्ती त्याप्रमाणे जबाबदार राहील.
#MaharashtraLandRevenueCode1966Marathi #महाराष्ट्रजमीनमहसूलसंहिता१९६६कलम२६३
#MLRCAct1966Marathisection263 #section263MLRCAct1966Marathi
INSTALL IOS / Iphone App
INSTALL Android APP
*टिप :या वेबसाईट वरील कंटेंट किंवा माहिती ही केवळ शिक्षण किंवा ऐज्यूकेशनल वापरासाठी आहे, तरी याचा कुठेही कायदेशीर कारवाई करीता वापर करु नये तसेच या मध्ये काही चुका आढळल्यास त्यासाठी प्रकाशक किंवा वेबसाईट चे मालक जबाबदार असणार नाहीत, चुका निदर्शनास आणून दिल्यास सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल.